“ ऑक्टोबर महिन्यात करावयाची शेतीची कामे“
खरीप
हातचा गेलाय. रब्बीवर अपेक्षांचे ओझे आहे पण नियोजन चुकल्यास हेही गमवावे लागेल.
अपेक्षांपेक्षा वास्तवावर लक्ष केन्द्रित करून नियोजन करणे गरजेचे आहे. झालेल्या
श्रावण सरींनी आशा पल्लवित केल्या आहेत, त्या फलद्रूप करून घेवूया. रब्बी पिकांच्या
पेरणीनंतर पावसाची खात्री नसते. बियाणाची उगवण जमिनीतील ओलाव्यावर अवलंबून असते.
नियोजनात लक्षात घ्यायच्या बाबी:
*खरीप पिकांच्या कापणीनंतर रब्बी पिकांच्या पूर्वमशागतीची कामे प्रामुख्याने वखरणी अथवा नांगरणी जास्त प्रमाणात केल्यास जमिनीतील ओलावा उडून जातो. त्याचा विपरीत परीणाम रब्बी पिकांच्या उगवणीवर आणि वाढीवर होतो. उत्पादनात घट येते म्हणून पूर्वमशागतीची कामे गरजेनुसार कमीत कमी प्रमाणात करावीत.
*रब्बी हंगामातील पिकांसाठी जलसंधारणाच्या उपायांचा अवलंब करावा.
*शक्यतो जमिनीचा पृष्ठभाग भुसभुशीत करून अथवा सरी पाडून खरीप हंगामातील उशिरा पडणाऱ्या पावसाचे मूलस्थानी संधारण करावे.
* ज्या क्षेत्रावर खरीप घेता आला नाही किंवा रब्बीकरिता खास राखून ठेवलेल्या क्षेत्रात पुढील जलसंधारण उपाय करावेत.
१ बळिराम नांगराच्या साह्याने उभी-आडवी मशागत करणे, तणविरहित राखण्याकरिता वखराच्या एक-दोन हलक्या पाळ्या देणे.
२ सपाट अथवा कमी उताराच्या भारी जमिनीमध्ये १० बाय १० मीटरचे चौरस वाफे करून त्यामध्ये पेरणी करणे.
३ मध्यम उताराच्या जमिनीवर ५ ते १० मीटरचे चौरस अथवा चौकोनी वाफे करून त्यामध्ये पेरणी करणे.
४ जसलंधारण सरी काढून, दोन सरींमध्ये भागात पेरणी करणे.
५ रोपांची प्रति हेक्टरी योग्य संख्या राखणे हे कोरडवाहू शेतीत महत्त्वाचे असते. त्यासाठी बियाण्यांचे योग्य प्रमाण राखण्यासाठी योग्य अंतरावर पेरणी करावी. पिकाच्या शिफारशीप्रमाणे रोपांच्या दोन ओळीतील अंतर ठेवावे.
६ पेरणी खोलीवर आणि पुरेशा ओलाव्यात केल्यास उगवण चांगली होते. रोपांची संख्या योग्य राहते.
७ योग्य वेळी पेरणी केल्यास उपलब्ध ओलावा, अन्नद्रव्ये यांचा अधिक फायदा घेता येतो.
८ योग्य वेळी पेरणी केलेल्या पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. इत्यादि.
पीक पद्धती निवडत असता जमिनीचा प्रकार लक्षात घ्यायला हवा.
*मध्यम खोल जमिनीवर रब्बी ज्वारी, करडई, रब्बी ज्वारी + करडई (६:३) आंतरपीक ,हरभरा. करडई +हरभरा (६:३) ही पिके निवडावीत तर खोल जमिनीवर - रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पीके निवडावीत.
*रब्बी हंगामात सलग पिकाऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नामध्ये स्थिरता राहते. तसेच, हेक्टरी अधिक उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळतो. तसेच, रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धती अधिक आर्थिक फायदा देणाऱ्या आहेत.
*रब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील तफावतीला कमी बळी पडणाऱ्या जातीची निवड करावी. पावसाचा ताण सहन करणाऱ्या व कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित वाणांची निवड करावी. रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकांचे शिफारस करण्यात आलेले सुधारित आणि संकरीत वाण पुढीलप्रमाणे आहेत.
रब्बी ज्वारी - मालदांडी ३५-१, एसपीव्ही-६५५, एसपीव्ही-८३९, फुले यशोदा (एसपीव्ही-१३५९), परभणी मोती (एसपीव्ही- १४११), स्वाती (एसपीव्ही-५०४),फुले माऊली
सूर्यफूल -मॉर्डन, एससीएच-३५, ई.सी. ६८४१४, सिद्धेश्वर (एल.एस.-११)
करडई -भीमा, शारदा, तारा, एन-६२-८, अनेगिरी, नारी - ६, पीबीएनएस-१२
हरभरा -विजय, बीडीएन-९-३, विशाल जी-१२, आयसीसीव्ही-२
* सर्वसाधारणपणे रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपवावी. हरभरा या पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात संपवावी.
* या कालावधीत जमिनीमध्ये पेरणीयोग्य परिस्थिती नसल्यास रब्बी हंगामातील पिकांची पेरणी ३० ऑक्टोबरपर्यंत करता येते. अशा वेळी रब्बी हंगामातील पीक नियोजन करताना आपत्कालीन पीक शिफारशीचा अवलंब करावा.
* रब्बी हंगामाकरिता आपत्कालीन पीक नियोजन असे आहे.
सुर्यफुल - २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
जवस -२० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
करडई - ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
हरभरा - ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर
रब्बी ज्वारी - ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर.
जीरायत गव्हाची पेरणी १५ ते ३० ऑक्टोबर पुर्वी पुर्ण करावी त्यासाठी २२.५ सेंमी. अंतरावर एन.आय.डी. डब्ल्यू १५ (पंचवटी) एन,५९, एन ५४३९, एन ८२२३, या जातीची ४० किलो एकरी बियाणे वापरुन लागवड करावी व लागवडीचे वेळा ४०.२०.२० किलो नत्र, स्फुरद,पालाश, प्रती हेक्टरी द्यावे.
बागायती गव्हाचा वेळेवर पेरणीसाठी शेताची पुर्वमशागतीची कामे पुर्ण करावीत व लागवडीसाठी एच.डी.२१८९,एन.आय.ए.डब्ल्यू.३०१, एम.ए.सी.एम.२४९६, डी.डब्ल्यू.आर.१६२ या सरबती वाणाच्या एम.ए.सी.एस.२८४६ या बक्षी वाणाची निवड करावी तसेच उशीरा पेरणीसाठी एच.आय.९७७, एच.डी.२५०१, एन.आय.ए.डब्ल्यू.३४ या वाणाची निवड करावी.
रब्बी ज्वारीची पेरणी उशीरात उशीरा १५ ऑक्टोबर पर्यत पुर्ण करावी.
करडईची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यत पुर्ण करावी त्यासाठी भीमा, नीरा, तारा, या काटेरी तर नारी-६, एन.एच.-१, या बिनकाटेरी वाणाची निवड करावी ४५ X २० सेंमी. अंतरावर भारी जमीनीत लागवड करुन ६०: ३०:० किलो नत्र व स्फुरद खताची मात्रा द्यावी, पैकी अर्धे नत्र पेरणीच्या वेळी व अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यत सुर्यफुलाची लागवड करावी त्यासाठी ईसी ६८४ १४, मॉर्डेन ,एस.एस.५६, के.बि.एस.एच.११, ऐ.पी.एस.एच.११, एल.डी.एम.आर.एस.एच.१, ३, महिको०८, महाबिज३३, इत्यादी सरळ किंवा संकरीत वाणापैकी निवड करावी व ४५ X २२.५ सेंमी. अंतरावर लागवड करुन ६०.३०.३०. किलो नत्र, स्फुरद, पालाश, प्रती हेक्टरी खते द्यावीत. अर्धी नत्राची मात्रा पेरणी वेळी व उर्वरीत अर्धी मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी. बीयाण्यास २५० ग्रॅम अझाटोबॅक्टर व २५० ग्रॅम पी.एस.बी. प्रती १० किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी.
रब्बी हंगामातील मोहरी, जवस यांची पेरणी १५ ऑक्टोबर पर्यत व हरभरा, मका, यांची पेरणी १५ ऑक्टोबर पासून पुढे १५ नोव्हेंबर पर्यत पुर्ण करावी, त्यासाठी मोहरीच्या वरुणा, सिता, टि.एम.४, टि.एम.२, जवसाच्या जीवन, गौरव, श्वेता, पुसा२, हरभरा विजय, विशाल, जी१२, जॅकी या साध्या वाणाची निवड करावी.
जनावराच्या चारासाठी ओट, ज्वारी, मका, बरसीम, लसूनघास, इत्यादी पिकाची निवड करावी. त्यासाठी ओटच्या केंट, जे.एच.ओ.८२२, ज्वारीच्या रुचिरा, निवळा, एमपी चारी, एस.एस.जी.५९३, मक्याच्या अफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझीट, गंगा सफेद, लसुणघासाच्या आर.एल.८८, सिरसा९, आनंद२,३, बरसीम घासाच्या वरदान जेबी१, मेस्कावी या जाती निवडाव्यात व पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यत पुर्ण करावी.
फळझाडामध्ये कागदी लिंबूच्या ५ वर्षाच्या पुढील झाडास नत्राच्या दुसरा हप्ता २५० ग्रॅम नत्र प्रती झाडप्रमाणे द्यावा.
द्राक्षामधील ऑक्टोबर छाटणीचे काम पुर्ण करुन छाटणी नंतर डोळे चांगले फुटण्यासाठी थायोयुरीया व ४००.२५०.४०० किलो प्रती हेक्टरी नत्र स्फुरद व पालाश द्यावे.
अंजिरात छाटणीनंतर लगेच डोळे फुटण्यासाठी ५०० पीपीएम इथरेल वापर करावा.
जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत व जनावरांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक पावडर लावा तसेच परमेथ्रीन १मि.ली. प्रती लिटर फवारणी योग्य ठरते.लिव्हर फ्ल्युक रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून जनावरास जंताचे औषध पाजावे आणि या नंतर लिवर टानीक द्यावे व पिण्यास नेहमी स्वच्छ पाणी द्यावे.शेळ्या,मेढ्यांना आंत्रविषार, लाळखुरकत व घटसर्प रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण करून घ्या.
चारा हा भविष्यातील यशस्वी जोड उद्योगाचा मूलभूत घटक ठरणार आहे.मागे झालेल्या थोड्याफार पावसाने सध्या हिरवळ दिसतेय. यातील जास्तीत जास्त चारा योग्य प्रकारे वापर करावा. जास्तीत जास्त चारा मुरघास करण्यासाठी वापरावा. जुना चारा असेल तर तो टाकून देण्या ऐवजी युरिया प्रक्रिया करून वापरावा. भविष्यात चारा आणि पाणी हिच शेतीतील सगळ्यात मोठी आव्हाने ठरू शकतात. यांचे योग्य नियोजन करा.
ऊस पीक सरसकट मोडता येणे शक्य नाही पण किमान त्याला ठिबक संच आवश्य वापरा.
*खरीप पिकांच्या कापणीनंतर रब्बी पिकांच्या पूर्वमशागतीची कामे प्रामुख्याने वखरणी अथवा नांगरणी जास्त प्रमाणात केल्यास जमिनीतील ओलावा उडून जातो. त्याचा विपरीत परीणाम रब्बी पिकांच्या उगवणीवर आणि वाढीवर होतो. उत्पादनात घट येते म्हणून पूर्वमशागतीची कामे गरजेनुसार कमीत कमी प्रमाणात करावीत.
*रब्बी हंगामातील पिकांसाठी जलसंधारणाच्या उपायांचा अवलंब करावा.
*शक्यतो जमिनीचा पृष्ठभाग भुसभुशीत करून अथवा सरी पाडून खरीप हंगामातील उशिरा पडणाऱ्या पावसाचे मूलस्थानी संधारण करावे.
* ज्या क्षेत्रावर खरीप घेता आला नाही किंवा रब्बीकरिता खास राखून ठेवलेल्या क्षेत्रात पुढील जलसंधारण उपाय करावेत.
१ बळिराम नांगराच्या साह्याने उभी-आडवी मशागत करणे, तणविरहित राखण्याकरिता वखराच्या एक-दोन हलक्या पाळ्या देणे.
२ सपाट अथवा कमी उताराच्या भारी जमिनीमध्ये १० बाय १० मीटरचे चौरस वाफे करून त्यामध्ये पेरणी करणे.
३ मध्यम उताराच्या जमिनीवर ५ ते १० मीटरचे चौरस अथवा चौकोनी वाफे करून त्यामध्ये पेरणी करणे.
४ जसलंधारण सरी काढून, दोन सरींमध्ये भागात पेरणी करणे.
५ रोपांची प्रति हेक्टरी योग्य संख्या राखणे हे कोरडवाहू शेतीत महत्त्वाचे असते. त्यासाठी बियाण्यांचे योग्य प्रमाण राखण्यासाठी योग्य अंतरावर पेरणी करावी. पिकाच्या शिफारशीप्रमाणे रोपांच्या दोन ओळीतील अंतर ठेवावे.
६ पेरणी खोलीवर आणि पुरेशा ओलाव्यात केल्यास उगवण चांगली होते. रोपांची संख्या योग्य राहते.
७ योग्य वेळी पेरणी केल्यास उपलब्ध ओलावा, अन्नद्रव्ये यांचा अधिक फायदा घेता येतो.
८ योग्य वेळी पेरणी केलेल्या पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. इत्यादि.
पीक पद्धती निवडत असता जमिनीचा प्रकार लक्षात घ्यायला हवा.
*मध्यम खोल जमिनीवर रब्बी ज्वारी, करडई, रब्बी ज्वारी + करडई (६:३) आंतरपीक ,हरभरा. करडई +हरभरा (६:३) ही पिके निवडावीत तर खोल जमिनीवर - रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पीके निवडावीत.
*रब्बी हंगामात सलग पिकाऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नामध्ये स्थिरता राहते. तसेच, हेक्टरी अधिक उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळतो. तसेच, रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धती अधिक आर्थिक फायदा देणाऱ्या आहेत.
*रब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील तफावतीला कमी बळी पडणाऱ्या जातीची निवड करावी. पावसाचा ताण सहन करणाऱ्या व कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित वाणांची निवड करावी. रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकांचे शिफारस करण्यात आलेले सुधारित आणि संकरीत वाण पुढीलप्रमाणे आहेत.
रब्बी ज्वारी - मालदांडी ३५-१, एसपीव्ही-६५५, एसपीव्ही-८३९, फुले यशोदा (एसपीव्ही-१३५९), परभणी मोती (एसपीव्ही- १४११), स्वाती (एसपीव्ही-५०४),फुले माऊली
सूर्यफूल -मॉर्डन, एससीएच-३५, ई.सी. ६८४१४, सिद्धेश्वर (एल.एस.-११)
करडई -भीमा, शारदा, तारा, एन-६२-८, अनेगिरी, नारी - ६, पीबीएनएस-१२
हरभरा -विजय, बीडीएन-९-३, विशाल जी-१२, आयसीसीव्ही-२
* सर्वसाधारणपणे रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपवावी. हरभरा या पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात संपवावी.
* या कालावधीत जमिनीमध्ये पेरणीयोग्य परिस्थिती नसल्यास रब्बी हंगामातील पिकांची पेरणी ३० ऑक्टोबरपर्यंत करता येते. अशा वेळी रब्बी हंगामातील पीक नियोजन करताना आपत्कालीन पीक शिफारशीचा अवलंब करावा.
* रब्बी हंगामाकरिता आपत्कालीन पीक नियोजन असे आहे.
सुर्यफुल - २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
जवस -२० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
करडई - ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
हरभरा - ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर
रब्बी ज्वारी - ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर.
जीरायत गव्हाची पेरणी १५ ते ३० ऑक्टोबर पुर्वी पुर्ण करावी त्यासाठी २२.५ सेंमी. अंतरावर एन.आय.डी. डब्ल्यू १५ (पंचवटी) एन,५९, एन ५४३९, एन ८२२३, या जातीची ४० किलो एकरी बियाणे वापरुन लागवड करावी व लागवडीचे वेळा ४०.२०.२० किलो नत्र, स्फुरद,पालाश, प्रती हेक्टरी द्यावे.
बागायती गव्हाचा वेळेवर पेरणीसाठी शेताची पुर्वमशागतीची कामे पुर्ण करावीत व लागवडीसाठी एच.डी.२१८९,एन.आय.ए.डब्ल्यू.३०१, एम.ए.सी.एम.२४९६, डी.डब्ल्यू.आर.१६२ या सरबती वाणाच्या एम.ए.सी.एस.२८४६ या बक्षी वाणाची निवड करावी तसेच उशीरा पेरणीसाठी एच.आय.९७७, एच.डी.२५०१, एन.आय.ए.डब्ल्यू.३४ या वाणाची निवड करावी.
रब्बी ज्वारीची पेरणी उशीरात उशीरा १५ ऑक्टोबर पर्यत पुर्ण करावी.
करडईची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यत पुर्ण करावी त्यासाठी भीमा, नीरा, तारा, या काटेरी तर नारी-६, एन.एच.-१, या बिनकाटेरी वाणाची निवड करावी ४५ X २० सेंमी. अंतरावर भारी जमीनीत लागवड करुन ६०: ३०:० किलो नत्र व स्फुरद खताची मात्रा द्यावी, पैकी अर्धे नत्र पेरणीच्या वेळी व अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यत सुर्यफुलाची लागवड करावी त्यासाठी ईसी ६८४ १४, मॉर्डेन ,एस.एस.५६, के.बि.एस.एच.११, ऐ.पी.एस.एच.११, एल.डी.एम.आर.एस.एच.१, ३, महिको०८, महाबिज३३, इत्यादी सरळ किंवा संकरीत वाणापैकी निवड करावी व ४५ X २२.५ सेंमी. अंतरावर लागवड करुन ६०.३०.३०. किलो नत्र, स्फुरद, पालाश, प्रती हेक्टरी खते द्यावीत. अर्धी नत्राची मात्रा पेरणी वेळी व उर्वरीत अर्धी मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी. बीयाण्यास २५० ग्रॅम अझाटोबॅक्टर व २५० ग्रॅम पी.एस.बी. प्रती १० किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी.
रब्बी हंगामातील मोहरी, जवस यांची पेरणी १५ ऑक्टोबर पर्यत व हरभरा, मका, यांची पेरणी १५ ऑक्टोबर पासून पुढे १५ नोव्हेंबर पर्यत पुर्ण करावी, त्यासाठी मोहरीच्या वरुणा, सिता, टि.एम.४, टि.एम.२, जवसाच्या जीवन, गौरव, श्वेता, पुसा२, हरभरा विजय, विशाल, जी१२, जॅकी या साध्या वाणाची निवड करावी.
जनावराच्या चारासाठी ओट, ज्वारी, मका, बरसीम, लसूनघास, इत्यादी पिकाची निवड करावी. त्यासाठी ओटच्या केंट, जे.एच.ओ.८२२, ज्वारीच्या रुचिरा, निवळा, एमपी चारी, एस.एस.जी.५९३, मक्याच्या अफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझीट, गंगा सफेद, लसुणघासाच्या आर.एल.८८, सिरसा९, आनंद२,३, बरसीम घासाच्या वरदान जेबी१, मेस्कावी या जाती निवडाव्यात व पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यत पुर्ण करावी.
फळझाडामध्ये कागदी लिंबूच्या ५ वर्षाच्या पुढील झाडास नत्राच्या दुसरा हप्ता २५० ग्रॅम नत्र प्रती झाडप्रमाणे द्यावा.
द्राक्षामधील ऑक्टोबर छाटणीचे काम पुर्ण करुन छाटणी नंतर डोळे चांगले फुटण्यासाठी थायोयुरीया व ४००.२५०.४०० किलो प्रती हेक्टरी नत्र स्फुरद व पालाश द्यावे.
अंजिरात छाटणीनंतर लगेच डोळे फुटण्यासाठी ५०० पीपीएम इथरेल वापर करावा.
जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत व जनावरांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक पावडर लावा तसेच परमेथ्रीन १मि.ली. प्रती लिटर फवारणी योग्य ठरते.लिव्हर फ्ल्युक रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून जनावरास जंताचे औषध पाजावे आणि या नंतर लिवर टानीक द्यावे व पिण्यास नेहमी स्वच्छ पाणी द्यावे.शेळ्या,मेढ्यांना आंत्रविषार, लाळखुरकत व घटसर्प रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण करून घ्या.
चारा हा भविष्यातील यशस्वी जोड उद्योगाचा मूलभूत घटक ठरणार आहे.मागे झालेल्या थोड्याफार पावसाने सध्या हिरवळ दिसतेय. यातील जास्तीत जास्त चारा योग्य प्रकारे वापर करावा. जास्तीत जास्त चारा मुरघास करण्यासाठी वापरावा. जुना चारा असेल तर तो टाकून देण्या ऐवजी युरिया प्रक्रिया करून वापरावा. भविष्यात चारा आणि पाणी हिच शेतीतील सगळ्यात मोठी आव्हाने ठरू शकतात. यांचे योग्य नियोजन करा.
ऊस पीक सरसकट मोडता येणे शक्य नाही पण किमान त्याला ठिबक संच आवश्य वापरा.
No comments:
Post a Comment