प्रस्तावना
जिल्हयात अद्याप मोठ्या प्रमाणावर कोरडवाहु क्षेत्रावर शेती
करण्यात येते. विविध योजनेच्या माध्यमातून सिंचन सूविधा निर्माण करण्याचा प्रयत्न
करण्यात येत आहे, परंतू
पावसाच्या लहरीपणामूळे शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे. मागील चार वर्षापासून
अनियमीत पाऊस, अल्प
पर्जन्यमान, अवेळी पाऊस,
पावसातील खंड यामूळे दूष्काळजन्य
परिस्थिती, चार्याचा
प्रश्न कायम भेडसावत आहे. यावर कायम स्वरुपी उपाय म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास
होय. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये मृद व जलसंधारण उपाय योजनामध्ये क्षेत्रीय उपचार, नाल्यावरील उपचार व शेततळी इ.चा समावेश होतो. कोरडवाहू क्षेत्रासाठी
शेततळे हे एक वरदान ठरु शकते त्यामूळे प्रत्येक शेतकर्यांनी आपल्या शेतावर शेततळी
निर्माण करण्यासाठी निर्धार केला पाहिजे.
मध्य प्रदेशातील देवास जिल्हा अशाच भीषण दूष्काळी
परिस्थितीचा सन 2004-05 मध्ये सामना
करीत होता. अती उपसा केल्यामूळे व 700 फूटापर्यंत
विंधन विहीरी घेतल्यामूळे पाणीपातळी खालावली होती. जेमतेम वर्षामधून फक्त कसेबसे खरीपाचे
पिक हाती लागत होते अशा परिस्थितीमध्ये देवासचे जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधीकारी व शेतकरी यांचे
पूढाकाराने शेततळ्याची संकल्पना पूढे आणली. स्वतःच्या खर्चाने शेतकर्यांनी
स्वतःच्या शेतावर शेततळी निर्माण केली त्यास प्रशासनाच्या वतीने प्रोत्साहन व
विविध योजनामधून आर्थीक मदत देऊन मोठ्याप्रमाणावर शेततळ्याची निर्मीती केली.देवास
जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीनूसार जमीन सपाट असल्यामूळे व काळी माती, चोपण असल्यामूळे
पाणी साठवण क्षमता चांगली आहे. या शेततळ्यामूळे शेतीचे
उत्पन्नात वाढ झालेली आहे, व पाणी, चार्याचा प्रश्न कायम स्वरुपी संपलेला
असून शेतकरी आत्मनिर्भर झालेला आहे.
लातूर
जिल्ह्यामधील भौगोलिक परिस्थीती थोडी वेगळी आहे. जमीन चढउतार आहे, जमीनीची खोली कमी जास्त आहे, काही ठिकाणी जमीन खडकाळ आहे तर काही
ठिकाणी मध्यम ते भारी जमीन आहे. जमीनीच्या प्रकारानूसार व भौगोलिक परिस्थितीचा
विचार करुन प्रत्येक शेतकर्यांनी शेततळ्याचा विचार केला तर निश्चीतच देवास
जिल्ह्यासारखी कायम स्वरुपी मात करता येऊ शकते.
शेततळ्याचा उद्देश
शेतात शेततळे करुन
पावसाचे भूपृष्ठावरील वाहून जाणारे पाणी त्यात साठविणे व त्याचा उपयोग
जलसिंचानासाठी करणे हा शेततळ्याचा मुख्य उद्देश आहे. पावसाच्या
अनियमीतपणामूळे जेंव्हा पावसा अभावी पिकास ताण पडतो अशा वेळी शेततळ्यात साठवलेल्या
पाण्यामध्यून एखादे दुसरे पाणी पिकास देता आल्यास पिक हमखास येते.
शेततळ्याचे फायदे
1.
आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होणे.
2.
पुरक सिंचनासाठी पिकाची उत्पादनात वाढ होते.
3.
मत्स्य संवंर्धनासाठी उपयोग होतो.
4.
भुगर्भातील पाण्याचे पुनर्र्भरण होते.
म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत शेततळी लाभार्थी निवडीचे निकष
1.
शेतकर्याकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हे. व जास्तीत जास्त 2.00 हे. जमीन असणे आवश्यक.
2.
यापूर्वी इतर योजनेच्या माध्यमातून विहिर किंवा इतर सिंचन
सूविधा मंजूर केलेली नसावी.
शेततळे घेण्यासाठी तांत्रीक निकष पूर्ण करणारी
जागा असलेला शेतकरी.
लाभार्थी निवड-
कार्यक्रमांतर्गत खालील प्रवर्गातील लाभार्थीची निवड निकषाप्रमाणे
करावयाची आहे.
1.
अनुसुचित जाती/जमाती/भटक्या व भटक्या विमुक्त जमाती मधील शेतकरी
2.
दारिद्र्य रेषेखालील शेतकरी
3.
महिला प्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व असलेले कुटुंब
4.
भुसुधार योजनेचे लाभार्थी , इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी.
5.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी
वरील
प्रर्वगातील पुरेशे शेतकरी उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील सर्व शेतकरी.
शेततळ्याचे जागा निवडीचे तांत्रीक निकष
शेततळे ही योजना कृषि
विभागामार्फत पाणलोटाचा उपचार म्हणून पूर्वीपासून राबविण्यात येत असल्याने
तांत्रीक बाबी व जागेची निवड खालील प्रमाणे असावेत.
1. जमीनीतून पाणी
पाझरण्याचे प्रमाण कमी असावे.
2. काळी जमीन व
चिकन मातीचे प्रमाण जास्त असावेत.
3. मुरमाड, वालूकामय, सच्छिद्ग खडक किंवा खारवट जमीन असू नये.
4. ज्या ठिकाणी
जमीनीचा उतार 3% पर्यंत असेल
त्या ठिकाणी शेततळे घेण्यात यावे.
5. मागणी
केलेल्या आकारमानाचे शेततळे लाभार्थीच्या स्वतःच्याच शेतात बसेल व चारही बाजूस
किमान 10 फूट जागा राहील अशीच
जागा निवडावी.
6. पाठबंधारे
प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात शेततळी घेण्यात येऊ नये.नाल्याच्या/ ओहोळाच्या
प्रवाहात शेततळे घेऊ नये.
शेततळ्याचे इनलेट व आऊटलेट (प्रवेशद्वार व निर्गमद्वार)
प्रवेशद्वाराच्या अगोदर साधारण दोन मी.
अंतरावर 2x2x1 मी. आकाराचा
सिल्ट ट्रॅप (गाळ साठणारा पिंजरा) चे खोदकाम करावे व गवत लावावे शेततळ्याच्या
दोन्ही द्वाराजवळ 2 मी
लांबीपर्यंत दगडाची पिचिंग करावी.
लाभार्थी निवडीचे निकष
शासन निर्णय क्र. मग्रारो-2015/प्रक्र.85/ रोहयो-1 मंत्रालय मुंबई दि. 14.09.2015 नूसार
लाभार्थी निवडीचे निकष खालील प्रमाणे आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 (06 ऑगष्ट 2014 पर्यंत सूधारीत) मधील अनुसूची 2 मध्ये परिच्छेद 4 मधील नमूद खालील प्रवर्गातील लाभधारक
शेततळी घेण्यात पात्र असतील.
अ. अनूसूचित जाती
आ. अनूसूचित जमाती
इ.
भटक्या जमाती
ई.
भटक्या विमू जमाती
उ.
दारिद्र्य रेषेखालील इतर कुटूंब
ऊ.
महिला प्रधान कुटूंब
ए.
शारिरीक अपंगत्व प्रधान असलेले कुटूंब
एै.
भूसूधार योजनेच लाभार्थी
ओ. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
औ.
अनूसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी (वनाधिकार मान्यता) अधिनियम
2006 नूसार पात्र व्यक्ती.
अं.
कृषि कर्जमाफ योजना सन 2008 नूसार अल्प
भूधारक (1 हे. पेक्षा
जास्त पण 2 हे.(5 एकर) पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन
मालक/कूळ) व श्रीमंत शेतकरी (1 हे. पर्यंत
जमीन असलेला शेतकरी) जमीन मालक/कूळ )
केंद्र शासनाच्या
नवीन मार्गदर्शक सूचनानूसार एका ग्रामपंचायत हद्दीतील उपरो प्रवर्ग अ ते औ मधील लाभार्थी
संपल्यानंतर अल्प भूधारक व सिमांत शेतकर्यांना लाभ देण्यात यावा.
लाभधारक निवड अर्हता पध्दती
1. म. गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी वरील अ ते अं प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तीक लाभार्थी म्हणून
या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
2. ईच्छूक
लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे हि जमीन कूळ कायद्याखालील येत असल्यास व 7/12 च्या उतार्यावर जर कूळाचे नांव असेल तर
योजना कूळाच्या संमतीने राबविण्यात यावी लाभार्थ्याने 7/12 व 8अ चे उतारे
अर्जासोबत जोडण्यात यावे.
3. ईच्छूक
लाभार्थ्यांने ग्रामपंचायतीकडे/कृषि विभागाकडे/इतर यंत्रणेकडे अर्ज दाखल करावा
4. म. गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कार्यपध्दतीप्रमाणे प्रत्येक काम
घेण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामसभा यांची मान्यता आवश्यक आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत
शेततळ्याची कामे करताना खालील गोष्टी अनिवार्य आहेत.
1. ग्रामपंचायत/ग्रामसभा
याचा लाभार्थ्याच्या निवडीबाबत ठराव व शिफारस.
2. प्रत्येक
शेततळे हे स्वतंत्र्य काम समजण्यात यावे.
3. सर्व
प्रकारच्या अकूशल कामासाठी जॉब कार्ड आवश्यक आहे.
4. ज्या
लाभार्थ्याला शेततळ्याचा लाभ देणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे तसेच
त्यांने मजूर म्हणून काम करुन मजूरी घेणे आवश्यक आहे.
5. जॉब कार्ड
धारकाच्या खात्यावर कामाची नोंद करावी.
6. दर 15 दिवसांनी मस्टर प्रमाणे मजूरी प्रधान
करावी.
7. ग्रामरोजगार
नोंदवहीत व ग्राम मालमत्ता नोंदवहीत सर्व प्रकारच्या नोंदी घेणे आवश्यक राहील.
8. एम.आय.एस.
वरील सर्व प्रकारच्या नोंदी घेणे आवश्यक आहे.
9. सदर कामाचे
सामाजीक अंकेक्षण अनिवार्य आहे,
त्यामूळे अकूशल व अर्धकूशल कामावरील खर्चाचे सर्व प्रमाणके/पावत्या सामाजीक
अंकेक्षणासाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
10. मृ.ग्रा.रोहयोच्या
मार्गदर्शक सूचनेनूसार हजेरीपत्रक ठेवणे,
बँक किंवा पोष्टामार्फत मजूरीचे प्रधान करणे आवश्यक आहे.
11. शेततळ्याचा
आकार शेतकर्याकडे उपलब्ध असलेल्या क्षेत्राप्रमाणे ठरवावा.
12. ग्रामपंचायत
यंत्रणा असल्यास ग्रामपंचायत स्तरावरील मजूरी साहित्याचे प्रमाण 60 : 40 व कृषि विभाग/ इतर यंत्रणा असल्या जिल्हास्तरावर
मजूरी साहीत्याचे प्रमाणे 60:40 प्रमाणात
ठेवण्यात यावे.
13. ई मस्टरचा
वापर करणे बंधनकारक आहे.
14. शेततळ्याची
कामे हाती घेण्यापूर्वी चाचणी खा घेणे आवश्यक आहे.
15. कंत्राटदार व
मजूर विस्थापित करणारी यंत्रणा बंदी राहील.
16. काम सूरु करण्यापूर्वी प्रगतीपथावर असताना व काम
पूर्ण झाल्यानंतरचे फोटो घेण्यात यावे व सदर फोटो संकेत स्थळावर अपलोड करावेत.
17. शेततळयाचे काही काम मजूराकडून व काही इतर
उपायोजनेद्वारे करताना मजूराकडून इतर योजनाकडे वळताना अशा तिन्ही टप्प्याचे फोटो
काढण्यात यावे व सदर फोटो संकेत स्थळावर अपलोड करण्यात यावे.
18. शेततळ्याचे 1 मी. खोदकाम हे अकूशल काम म्हणूनच करण्यात यावे.
शेततळी घ्यावयाच्या
ठिकाणच्या स्थानिक भौगोलिक परिस्थीतीनूसार शेततळ्याची लांबी व रुंदी यामध्ये
आवश्यकतेनूसार बदल करण्याची मूभा देण्यात येत आहे. तथापि यामूळे शेततळ्याच्या
विहीत आकारमानात बदल होणार नाही याची दक्षता घ्यावी.
10 x 10 x 3 मी 15 x 10 x 3 मी 15 x 15
x 3 मी 20 x 15 x 3 मी
20 x 20 x 3 मी 25 x 20 x 3 मी 25 x 25
x 3 मी 30 x 25 x 3 मी
30 x 30 x 3 मी
वरीलप्रमाणे 9 आकाराचे शेततळे – इनलेट व आऊटलेटसह आणि इनलेट
व आऊटलेट विरहित आपणास या योजनेमधून घेता येतात.
Best
ReplyDeleteसाहेब माहिती खुपच लाभ दायक आहे, त्या बद्दल धन्यवाद, परंतु शेततळ्याची लांबी व रुंदी बरोबर त्याची साठवण क्षमता दिली असती तर आजुन अधिक लाभ झाला असता• धन्यवाद ��
ReplyDeleteIf 10 acre land entitled equally on name of 2 brothers and both are making shetale .if they are constructing nearer toeach other then the middle common wall should not be there. .sothat construction cost will be less and diameter will increase water storage will be more .farmers will be benefited.so such rule should be created
ReplyDeletePlease shet talyache estiment pathava
ReplyDelete