Saturday, 3 October 2015

आयूर्वेद चंची – खास शेतकरी मिञासाठी



आयूर्वेद चंची खास शेतकरी मिञासाठी

आतापर्यंत आपण आजीबाईचा बटवा सर्व ठिकाणी वाचत आलो. त्यांचा आपल्या आरोग्यासाठी उपयोग घेतला. त्याच धर्तीवर आपल्याकडे उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर शेतीमध्ये करून कमी खर्चामध्ये कीड-रोग नियंत्रण पिक संजिवकांचे कार्य करू शकतो. यासाठीच हा लेखन प्रपंच. या माध्यमातून आठवड्यातून एकदा आपण या बटव्यातील एक एक बाब समजावून घेवूयात.

. अंडा जनीत आम्लः-

बाजारात विविध अमिनो ऍसीड्स उपलब्ध आहेत. कोणत्याही पिकांच्या चयापचय क्रियेमध्ये अमिनो आम्लांचा मोठा वाटा असतो. यामुळे पिकाची वाढ जोमदार सशक्त होण्यास मदत मिळते. बाजारातील अमिनो आम्ल घेण्यापेक्षा ते घरच्या घरी तयार करता आले तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. अत्यल्प खर्चामध्ये हे आम्ल तयार करता येते. यासाठी लागणारी सामुग्री म्हणजे एक प्लॅस्टीक किंवा काचेची बरणी, त्यात बसतील इतकी गावरान कोंबडीची अंडी, लिंबाचा रस.काचेच्या बरणीमध्ये गावरान कोंबडीचीअंडी एकावर एक उभी मांडावीत. कोणतेही अंडे फुटनार नाही याची दक्षता घ्यावी. बरणी साधारणपणे दोन इंच रिकामी ठेवावी. यामध्ये लिंबाचा रस (ताजे पिवळे धम्मक लिंबू घेवून त्यांचा रस काढावा) अंडी बुडतील इतपत टाकावा. त्यानंतर बरणीचे झाकण गच्च लावावे. दररोज सकाळी संध्याकाळी दोन वेळा बरणीचे झाकण काढून त्यातील गॅस काढावा. ही क्रिया चाळीस दिवसांपर्यंत करावी. चाळीस दिवसांमध्ये हे टॉनीक तयार होते. अट फक्त एकच ती म्हणजे बरणी उघडल्यानंतरतेथे असलेल्या घरातील माशांनी त्यात अंडी घातल्यास त्यामध्ये आसाडी पडते (आळी होते). त्यामुळे हे काम काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.याचा उपयोग कोणत्याही पिकावर होतो. वापरण्याचे प्रमाण एक लिटर पाण्यास दोन मिली आहे. हे टॉनीक तयार केल्यापासून सहा महिने उत्तम कार्य करते. सेंद्रिय शेती करणा-या शेतक-यांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे टॉनीक आहे. पिकाचे लागवडीपासून साधारण १२ ते १५ दिवसांनी पहिली फवारणी करावी. यानंतरच्या फवारण्या या गरजे प्रमाणे दर २१ दिवसांचे अंतराने कराव्यात

2.  बाजरीपासून कीटकनाशक तयार कराः-

 आपण कीड नियंत्रण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर करतो. हा वापर सर्वात जास्त भाजीपाला पिकामध्ये पहावयास मिळतो. भाजापिकांमध्ये सर्वात मोठी समस्या ही सर्व प्रकारच्या अळ्यांची असते. त्यांचे नियंत्रणासाठी सकाळी आपण त्यावर औषधांचा वापर करतो दुपारी तीच भाजी आधी आपण घरी खातो नंतर बाजारात विक्रीसाठी नेतो. अशा परिस्थितीमध्ये आपण या कीटकनाशकांच्या सतत संपर्कात राहतो. यामुळे विविध व्याधी आपल्या मागे लागलेल्या असतात.
यासाठी स्वतः स्थानीक पातळीवर औषध तयार करता आले तर उत्तम म्हणून एक बाजरीपासून तयार करावयाच्या अळीनाशकाबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. यासाठी एक किलो बजरीचे पीठ, एक १५ लिटरचा छोटे तोंड असलेला तेलाचा किंवा डालड्याचा डब्बा १० लिटर पाणी ही सामुग्री लागते. एक किलो बाजरीचे पीठ १० लिटर पाण्यात चांगले मिसळून घ्यावे. तयार झालेले मिश्रण १५ लिटरच्या डब्यात टाकावे. डब्ब्याचे तोंड झाळून घ्यावे किंवा ते हवाबंद करण्यासाठी एक चांगले झाकण त्यावर लावावे. हा डब्बा आपल्या उखंड्याच्या (शेणखत टाकण्याची जागा) मध्यभागी ते फुट खोल पुरावा. हा कालावधी साधारण ५० दिवसांचा असतो. यानंतर उखंड्यातून डब्बा बाहेर काढल्यानंतर त्यातील औषध सरळ फवारणीसाठी वापरता येते. डब्ब्यातील बाजरी पिठापासून तयार केलेले औषध मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेवून फवारणी करावी. या औषधामुळे मोठ्यात मोठ्या अळींचा नाश करण्याची क्षमता आहे. करून तर बघा. काय होईल डब्बा, बाजरीचे पीठच वाया जाईल. केल्या शिवाय समजणार नाही. शेतकरी बटव्यातील हे एक सुंदर कीटकनाशक आहे.

. फळमाशीसाठी स्थानीक सापळाः-

फळमाशीचा प्रादुर्भाव अशात संपूर्ण वर्षभर दिसून येत आहे. या माशीमुळे फळझाडे फळवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या माशीच्या जीवनक्रमाचा विचार केल्यास ही आपल्या घरातील माशी प्रमाणेच असून या माशीचे पंख हे पिवळ्या रंगाचे असतात. या माशीच्या नियंत्रणासाठी विविध उपाय आपण करतो. विशेषतः मिथिल युजिनॉलचे सापळे लावले जातात. एवढे करूनही ही माशी म्हणावी तशी नियंत्रणात येत नाही. कारण ही माशी झुंडीने सायंकाळी नंतर शेतात येते फळांचे नुकसान करते.
फळमाशी नियंत्रणासाठी घरगुती उपाय म्हणून प्लॅस्टीक बकेट मध्ये गव्हाचे काड किंवा साळीचे तणीस बारीक केलेले घ्यावे. यामध्ये गुळाचा पाक चांगला चिकटपणा आलेला (तार आलेला) टाकावा हे मिश्रण चांगले कालवावे. गव्हाच्या किंवा साळीच्या काडास यामुळे चांगला चिकटपणा येईल हे पाहणे आवश्यक आहे. तयार झालेले अमीश प्लॅस्टीक द्रोणामध्ये घेवून ते बागेमध्ये विविध ठिकाणी ठेवावे. यामध्ये असलेल्या गुळाच्या अंबट वासामुळे फळमाशी सुरूवातीला याकडे आकर्षीत होते. अमिशावर बसल्यानंतर तीचे पंख चिकट काडाला चिकटतात ती तेथेच मरते. करून बघायला काय हरकत आहे.


4. माश्याचे आम्लः-

बाजारात विविध अमिनो ऍसीड्स उपलब्ध आहेत. कोणत्याही पिकांच्या चयापचय क्रियेमध्ये अमिनो आम्लांचा मोठा वाटा असतो. यामुळे पिकाची वाढ जोमदार सशक्त होण्यास मदत मिळते. बाजारातील अमिनो आम्ल घेण्यापेक्षा ते घरच्या घरी तयार करता आले तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. अत्यल्प खर्चामध्ये हे आम्ल तयार करता येते. यासाठी लागणारी सामुग्री म्हणजे एक प्लॅस्टीक किंवा काचेची बरणी, एक मोठा मासा, गुळाचा पाक.
काचेच्या बरणीमध्ये एक मोठ्या आकाराचा मासा ठेवावा. गुळाचा पाक चांगला तयार करून घ्यावा. मासा बुडेल इतपत पाक त्यात टाकावा. त्यानंतर बरणीचे झाकण गच्च लावावे. दररोज सकाळी संध्याकाळी दोन वेळा बरणीचे झाकण काढून त्यातील गॅस काढावा. ही क्रिया चाळीस दिवसांपर्यंत करावी. चाळीस दिवसांमध्ये हे टॉनीक तयार होते. अट फक्त एकच ती म्हणजे बरणी उघडल्यानंतर तेथे असलेल्या घरातील माशांनी त्यात अंडी घातल्यास त्यामध्ये आसाडी पडते (आळी होते). त्यामुळे हे काम काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.
याचा उपयोग कोणत्याही पिकावर होतो. वापरण्याचे प्रमाण एक लिटर पाण्यास दोन मिली आहे. हे टॉनीक तयार केल्यापासून सहा महिने उत्तम कार्य करते. विशेष म्हणजे या टॉनिकच्या वापरामुळे पिकावरील मिलीबग (पिठ्या ढेकूण) कमी होण्यास मदत होते. सेंद्रिय शेती करणा-या शेतक-यांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे टॉनीक आहे. पिकाचे लागवडीपासून साधारण १२ ते १५ दिवसांनी पहिली फवारणी करावी. यानंतरच्या फवारण्या या गरजे प्रमाणे दर २१ दिवसांचे अंतराने कराव्यात.


5. पंचगव्यः एक सर्वांगसुंदर अमृत -

 पंचगव्य, हे एक सेंद्रीय उत्पादन आहे आणि याच्या वापरामुळे पिकांमध्ये प्रतीकारशक्ती निर्माण करण्यास मदत मिळते. तसेच पिकाची सर्वांगीन वाढ होण्यास मदत मिळते. पंचगव्यामध्ये एकुण नऊ घटकांचा समावेश होतो. यामध्ये गायीचे शेण, गोमुत्र, दुध, दही, गुळ, तुप, केळी, कच्चे नारळ पाणी यांचा समावेश होतो. यांच्या एकत्र वापरामुळे निसर्गातील सर्वच बाबींमध्ये सुंदर परिणाम मिळतो.
पंचगव्यातील पदार्थांचे प्रमाण
 गायीचे शेणः किलो
 गायीचे तुपः किलो
 वरील दोन्ही सकाळच्या किंवा सायंकाळच्या वेळी चांगले एकत्र मिसळून घ्यावे आणि दिवस ठेवावे. यानंतर तीन दिवसांनी
 गोमुत्रः १० लिटर
 पाणीः १० लिटर
 वरील घटक गायीचे शेण तुपाच्या मिश्रणात चांगले मिसळून हे मिश्रण १५ दिवस ठेवावे. हे मिश्रण दररोज सकाळी आणि सायंकाळी ढवळत राहणे आवश्यक आहे. यानंतर खालील घटक यामध्ये मिसळून पुढे सतत १५ दिवस याच प्रमाणे ढवळण्याची क्रिया करावी यानंतर पंचगव्य तयार होते.
गायीचे दुधः लिटर
 दहीः लिटर
 नारळ पाणीः लिटर
 ऊसाचा रसः लिटर
 चांगल्या पिकलेल्या केळीः १२
 वरील सर्व साहित्य एका मोठ्या तोंडाच्या माठात किंवा रांजणात किंवा सिमेंट टाकीत किंवा प्लास्टिक कॅनमध्ये वर दिलेल्या क्रमानुसार टाकावीत. वापरावयाचे भांडे सावलीत उघडे ठेवावे. दिलेले साहित्य टाकल्यानंतर मिश्रण दररोज सकाळ संध्याकाळ ढवळणे आवश्यक आहे.
पंचगव्य तयार होण्यासाठी ३० दिवसांचा कलावधी लागतो. काळजी एकच घ्यावयाची आहे ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हशीचे उत्पादन यामध्ये वापरू नयेत. गावरान गायीच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त परिणाम मिळतात. संकरित गायीमध्ये एवढे परिणाम मिळत नाहीत.
मिश्रण तयार करतांना भांडे जाळीने झाकावे म्हणजे त्यामध्ये घरातील माशा आपली अंडी घालणार नाहीत तसेच ईतर अनावश्यक घटक जाणार नाहीत. जर ऊसाचा रस मिळाला नाही तर ५०० ग्राम गुळ तीन लिटर पाण्यात मिसळून ते वापरावे.
वापरावयाचे प्रमाणः- लिटर पंचगव्य + १०० लिटर पाणी.

6. बायोडायनॅमीक कंपोस्ट खतः-

याबाबत माहिती घेण्यापुर्वी एक गोष्ट मला या ठिकाणी स्पष्ट करावयाची आहे ती म्हणजे सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील कोणतीही गोष्ट जाळून टाकू नये. शेतातील उत्पादीत धान्यांवर आपला अधिकार आहे. त्याचा कडबा निघाला तर त्यावर जनावरांचा अधिकार आहे परंतु त्यांचे पडलेले शेण परत शेतात गेले पाहिजे. कोणताही पाला पाचोळा किंवा बांधावरील तणे जाळू नयेत. आज सर्वत्र गहू मशीनने काढला जात आहे. त्यानंतर ते संपूर्ण शेतच काड जाळण्यासाठी भाजून काढण्याची क्रिया आपल्याकडे केली जाते. हे आपणास चुकीचे वाटत नाही काय. आपण यासाठी कोणतीही शेतातील वाया जाणारी गोष्ट असेल त्यापासून उपयुक्त असे कंपोस्ट खत तयार केले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या ठिकाणी कोणाचा प्रचार किंवा प्रसार करू इच्छीत नाही. आपणास घरच्या घरी कशा पद्धतीने कमी खर्चाचे कमी वेळेत खत तयार करण्याचे तंत्रज्ञान देता येईल हे पहात आहे. कंपोस्ट खत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. परंतु कोणताही खड्डा करता जमिनीवरच खत तयार करण्यासाठी वापरण्याची ही एक सर्वोत्तम पद्धत आहे असे माझे मत आहे.
बायोडायनॅमीक कंपोस्ट खत बनवण्यासाठी लागणारे साहित्यः-
शेतातील काडी कचरा, बनगी, -हाट्या, तुराट्या, वाळलेली बोंडे, शेतातील तण, कडुनिंब, रूचकी, निरगुडी, मोगली एरंड . ची पाने, गाजर गवत, बेशरम, गिरिपुष्प.
कामधेनु सिद्धी- किंवा सीपीपी कल्चर.
ताजे शेण ( ते १० दिवसांचे).
१५०० ते २००० लिटर पाणी.
बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत -
 सदर साहित्य जमा करून मोकळ्या सपाट जागेची निवड करावी.
एक टन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १५ फूट लांब, फूट रूंद ते . फूट उंच ढीग (डेपो) बनवावा.
ढिगाची दिशा पूर्वपश्चिम असावी.
डेपो तयार करतांना १५X फूट जागा साफ करून त्यावर हलकेसे पाणी शिंपडावे.
जमा केलेल्या वाळलेल्या सुकलेल्या काडी कच-यावर पाणी टाकून चांगले भिजवावे,
पहिल्या काडी कच-याच्या एक फूटाचे थरावर पाणी टाकावे.
दुस-या दोन ते तीन इंच जाडीच्या थरावर शेणकाला शिंपडावा.
किलो सीपीपी कल्चर १०० लिटर पाण्यात टाकून ४० ते ४५ मिनिटे उलट सुलट चांगले ढवळावे हे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात टाकावे.
त्यानंतर एक फूटापर्यंत सेंद्रिय पदार्थ ओले शेण यांचा थर द्यावा.
प्रत्येक थरावर सीपीपी द्रावण शिंपडणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे ते . फूटापर्यंत उंच डेपो तयार करावा तो शेण मातीने लिंपून घ्यावा.
साधारणतः ३५ ते ४० दिवसानंतर डेपोस पलटी द्यावी. अशा प्रकारे ७० ते ७५ दिवसांत उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.
 





-    आपणही आपले अनुभव, प्रयोग, निरीक्षण , संकलीत माहीती वा इतर आपल्‍या सर्वासाठी जरूर शेअर करावी ही विनंती

No comments:

Post a Comment